नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Saturday, March 5, 2011

आठवणीतील लहानपणीच्या कविता


आठवणीतील लहानपणीच्या कविता

“मी आज उदास रडणे

खुशीत गात आहे,

शिशिरातल्या गळक्या पालावितून

वसंत बहरत आहे”

“वाटले तैसे होणार होते,

होण्याचीच वाट होती.

पौर्णिमा सरली होती,

अमावस्येची वाट होती.”



“डोळे होते ओले

तीव्र काही बोले

सुख:दुखांच्या वेदनांना

रहस्य उलगडतांना

मुखपृष्टावर अणे.”


No comments:

Post a Comment