नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Sunday, March 6, 2011



“र‘हास्य’ आहार”

“प्रगतीच्या ताकला शिस्तीचे बेसन लावा,

विश्वास सुंदरतेला तेजाच्या तुपाची फोडणी घाला...

पोळीतल्या माणसा-माणसामधील दुरावा,

नष्ट करण्या त्यात प्रेमाचे गोड पुरण भरा...

वेगवेगळ्या जाती,धर्म,पंथांच्या भाज्या एकत्र करून,

एकात्मतेची फोडणी घाला आणि करा कोशिम्बीर तयार...

वामन म्हणे एकदाचे होऊनिया जाऊ दे,

कढी,पुरणपोळी आणि कोशिंबीर तयार..

म्हणजे मिळेल स्वादिष्ठ पौष्टिक आहार...


No comments:

Post a Comment