नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Sunday, March 6, 2011



'अद्वैत...' 

“मनातील संवेदनांना फुटतो आज कंठ,

अलगद निघतो स्वर मधुर संथ,

कोंडून घे रे सुरांना,

बिलगून मन हे सुरेले,

गळू दे रे लळा

गोळा करितो चांदणे मी,

भेट आणली तुला

आहे सखे चांदण्याचा माळा

या मळ्याच्या पौर्णिमेला,

स्वर येतील तुझ्या ओठावरी,

साद देतील तुला स्वप्नचान्दणी,

आठवून देतील तुला माझा संवेदनांच्या बखारी,

बिलगून घे रे सुरेल त्या आठवणी,

का तू आणतेस हा दुरावा?

एकची श्वास दोघांसी पुरावा,

जीवात-जीव ऐसा सखे मुरावा,

बघ मन अपुले असे गुंतवावे,

बिलगून घे रे वेदना!

कोणाच्या ह्या संवेदना हेही न कळावे,

शरीर दोन असावे...ह्रिदय एक व्हावे...”


No comments:

Post a Comment