नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Sunday, March 6, 2011


“विसरलेला ‘उद्याचा’ इतिहास”

“ झाली जीर्ण सारी इतिहासाची पाने,

ऊच ताठ उभी,खाली झुकली माने.

जालियनवाला विसरलो घडले नंदीग्राम,

संयोग-भूत भविष्याचा,हा अजब आहे संग्राम.

दलित विसरले दलितांचे आंबेडकराजी,

म्हणून दालीतांनीच घडविले दलितांचे खैरलंजी.

विसरलो देशाचे स्वाभिमानी ऐतिहासिक सूत्र,

म्हणूनच उरले इंग्रजांचे इंग्रजी पुत्र.

येतो वारा जातो वारा सोडून जातो धूळ,

इंग्रज आले येऊन गेले पण सोडून इंग्रजी मुळ.

कोटींच्या कोटी शतके भारत जगला

सिकंदर आला,बाबर आला,गाझी-नादिर-अब्दाली आला,

अरे तरीही,जुलूम करणाऱ्या जुल्मिंचा कुळ नाही उमगला.

घाण सगळी इतिहासाची लक्षात राहिली छान,

स्वधर्म,स्वराष्ट्र,स्वाभिमान रक्षण्याचे भुललो आम्ही भान.

छत्रपती शिवरायांची काय होती शिकवण,

कोण गुरु,कोण शिक्षक यांचा वाद आम्हा पसंद,

परि इतिहास-वादंगाचे केले आम्ही कालवण,

पण ठेवा जरा शिवरायांची आठवण.

जे भुलले इतिहास,काय घडवणार ते इतिहास,

जे भुलले इतिहास,होणार त्यांचा उपहास.

अरे वेचा सारी जीर्ण इतिहासाची पने,

झुकलेली पुन्हा उभी ताठ राहतील माने.”

No comments:

Post a Comment