“विसरलेला ‘उद्याचा’ इतिहास”
“ झाली जीर्ण सारी इतिहासाची पाने,
ऊच ताठ उभी,खाली झुकली माने.
जालियनवाला विसरलो घडले नंदीग्राम,
संयोग-भूत भविष्याचा,हा अजब आहे संग्राम.
दलित विसरले दलितांचे आंबेडकराजी,
म्हणून दालीतांनीच घडविले दलितांचे खैरलंजी.
विसरलो देशाचे स्वाभिमानी ऐतिहासिक सूत्र,
म्हणूनच उरले इंग्रजांचे इंग्रजी पुत्र.
येतो वारा जातो वारा सोडून जातो धूळ,
इंग्रज आले येऊन गेले पण सोडून इंग्रजी मुळ.
कोटींच्या कोटी शतके भारत जगला
सिकंदर आला,बाबर आला,गाझी-नादिर-अब्दाली आला,
अरे तरीही,जुलूम करणाऱ्या जुल्मिंचा कुळ नाही उमगला.
घाण सगळी इतिहासाची लक्षात राहिली छान,
स्वधर्म,स्वराष्ट्र,स्वाभिमान रक्षण्याचे भुललो आम्ही भान.
छत्रपती शिवरायांची काय होती शिकवण,
कोण गुरु,कोण शिक्षक यांचा वाद आम्हा पसंद,
परि इतिहास-वादंगाचे केले आम्ही कालवण,
पण ठेवा जरा शिवरायांची आठवण.
जे भुलले इतिहास,काय घडवणार ते इतिहास,
जे भुलले इतिहास,होणार त्यांचा उपहास.
अरे वेचा सारी जीर्ण इतिहासाची पने,
झुकलेली पुन्हा उभी ताठ राहतील माने.”
No comments:
Post a Comment