नमन अवघ्या या रसिक जना या....
खरं हे लिखाण लिहायचा म्हणून लिहिलेलं नाही, कधी तरी मनात अडलेला मनाला, अडवणारा असा काही विषय एका मना पासून अनेक मनांना पोहचावा आणि त्याची कधी धग असेल, कधी उर्जा असेल तर कधी आनंद ही असेल, तो सतत जाणवावा महणून हा प्रपंच...वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे विचार मनात तरळतात आणि आपण त्यांना कसे साद देतो हे पाहण्याचा हा यज्ञसमारंभ...सामिध्या विचारांच्या... विचारांच्याच तप्त अग्नी मंडळातून अस्सल 'सुवर्णा'ला सदैव तपासणाऱ्या नव्हे अधिक प्रज्वलित करणाऱ्या...ज्याची पुण्याई सुवर्णा प्रमाणे नेहमी वृद्धिंगत होणारी...आयुष्याच्या शेवटा पर्यंत आणि नंतरही...ह्या यज्ञाला समिधा फक्त 'भटांच्या' नकोत तर अवघ्या विश्वाच्या हव्या आहेत....अर्पण व्हा..या यज्ञात.
.

Sunday, March 6, 2011


“एक प्रश्न जीवनाचा”

“कोणी माला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का ?

पैसे कमविण्यासाठी का खर्चविण्यासाठी,

मित्र तयार करण्यासाठी का शत्रूंना मारण्यासाठी,

स्वतः जिंकण्यासाठी का दुसऱ्याला हरविण्यासाठी,

या दोन्ही तर एका नाण्याच्या दोन बाजू !

पण मुद्दा तर मागेच राहिला ना-

कोणी मला सांगेल का –

माणूस जीवन सजतो का?

जगण्यासाठी जगतो तो का जाणण्यासाठी जगतो तो,

मनासाठी जगतो तो का बुद्धीसाठी जगतो तो,

जगण्यासाठी जगतो तो का मारण्यासाठी जगतो तो,

माऊलीच्या पोटातून माऊलीच्याच कुशीत जायला जगतो का ?

कोणी माला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का?

मिळाले हे जीवन आपल्याला

आहे किती हे सुंदर,

एवढे सुंदर जीवन जागून सुद्धा,

शेवटी माणूस मातीच पांघरतो ना?

कोणी मला सांगेल का-

माणूस जीवन जगतो का?”


No comments:

Post a Comment